Saturday, April 15, 2017

विषण्ण.....

खरंय, मन विषण्ण होऊन जातं मृत्यूच्या वावरानं
पणजीहून भरधाव वेगानं मुंबई गाठणारी महाकाली ट्रॅव्हल्स जगबुडीच्या पुलावरुन उलटी कोसळली.. केदारचा फोन आला की अरे माझ्या मित्राच्या आईवडीलांचा तपास लागत नाहीये.. मी तीन चार ठिकाणी फोन करुनही तपास न लागल्याने शेवटी स्वतः गेलो खेडला.... वाचलं कोणीच नाही पण ओळख पटवणं महामुश्किल होतं.... फोटो मागवून घेतलाच होता... ताटकळलेले पोलिस कोणी आलं की मरगळ झटकून पुढे यायचे..ओळख पटली की हलकासा निश्वास टाकायचे.. एवढ्याशा त्या पीएम रुममधे 34 दुर्दैवी देह ... अपघाताने ओळख बदललेली ... मधेच कधीतरी हेच ते दोघेजण म्हणून ओळख पटवून लटपटत्या पावलाने बाहेर येऊन बसलो .... मृत्यूच्या त्या भयानक तांडवानं मन सुन्न करुन टाकलं होतं.... खरंतर त्या दोन अनोळखी व्यक्ती पण आता किमान त्यांचे नातेवाईक येईपर्यंत माझ्याशी नातं जुळवलेल्या त्या दोघांसाठी पुढचे चार तास त्या विषण्ण वातावरणात काढायचे होते

No comments:

Post a Comment